उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा पुढाकार
शिष्यवृत्ती आणि मोफत शिक्षणामुळे राज्यातील तरुणांना मिळणार मोठे पाठबळ
रायगड, दि. २२ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग राज्यातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि कौशल्य विकासासाठी खऱ्या अर्थाने एक मोठा आधारवड ठरत आहे. राज्याची युवाशक्ती शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व्हावी या उद्देशाने हा विभाग गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगाराभिमुख कौशल्यांवर विशेष भर देत सातत्याने कार्यमग्न आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता विविध प्रभावी शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित केल्या आहेत.

Comments
Post a Comment