मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
🚨 सातारा : पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांची तासगांव (जि. सांगली) येथून सातारा जिल्ह्यात बदली... 🚨 पुणे शहर वाहतूक विभागातर्फे मॉडीफाईड सायलेंसर असणाऱ्या बुलेट मोटारसायकल विरोधात मोहीम, ३४८ बुलेट मोटारसायकलवर कारवाई... 🚨 सोलापूर : खुळेवाडी, ता. माळशिरस येथे तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या; पती, दिर, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल... 🚨 जालना : आंतरराज्य घरफोडी करणारा कुख्यात गुंड रवी शिंदे पोलीसांच्या जाळ्यात...🚨 भंडारा : बाळ विक्री प्रकरण - ४ लाख ७० हजारांचा सौदा, डॉ. नितेश वाजपेयी यांच्यासह साथीदारांना अटक...🚨

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट
जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश
 शांतता क्षेत्रात सूट लागू नाही 

रायगड-अलिबाग, दि. १३ (प्रतिनिधी) :- केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षातील १५ दिवस ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरास सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सूट देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड, किशन जावळे यांनी दि.१ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत १६ दिवसांकरिता ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरास सूट दिल्याची अधिसूचना जारी केली आहे.
या आदेशानुसार श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा पाळून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सूट देण्यात आलेले दिवस : शिवजयंती १९ फेब्रुवारी (१ दिवस), होळी पौर्णिमा २ मार्च (१ दिवस), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल (१ दिवस), ईद-ए-मिलाद २६ ऑगस्ट (१ दिवस), गणपती उत्सव १५ सप्टेंबर (दुसरा दिवस), १९ सप्टेंबर (गौरी विसर्जन), २५ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) ३ दिवस, गणपती (साखरचौथ विसर्जन) ३० सप्टेंबर (१ दिवस), नवरात्री उत्सव १७ ते २० ऑक्टोबर (४ दिवस), दिवाळी (लक्ष्मीपूजन) ८ नोव्हेंबर (१ दिवस), ख्रिसमस २५ डिसेंबर (१ दिवस), ३१ डिसेंबर – (१ दिवस).
दरम्यान ही सूट राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात लागू राहणार नाही. ध्वनीप्रदूषण नियम, २००० मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ च्या कलम १९ (अ) अन्वये आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


Comments

Popular posts from this blog